राज्य सरकारच्या जिल्हा मंचामध्ये राज्य सरकार किती सदस्य नियुक्त करतात?
जिल्हा मंचावर अध्यक्ष व दोन सदस्यांची नेमणूक करण्यात येते.
जिल्हा मंच :
जिल्हा मंचावर अध्यक्ष व दोन सदस्यांची नेमणूक करण्यात येते. जिल्हा मंचाच्या अध्यक्ष पदी कार्यरत जिल्हा न्यायाधिश किंवा निवृत्त जिल्हा न्यायाधीश किंवा जिल्हा न्यायाधीश होण्याची अर्हता ज्या व्यक्तीकडे असेल अशा व्यक्तीची नियुक्ती करण्यात येते.
मंचावरील सदस्यांची राज्य आयोगाच्या सदस्याप्रमाणेच अर्हता विहित केली आहे. राज्यात प्रत्येक जिल्हयासाठी स्वतंत्र मंचाची स्थापना करण्यात आली आहे. त्याशिवाय मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे व मुंबई उपनगर येथे ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण जास्त असल्यामुळे या जिल्हयामध्ये प्रत्येकी एक असे एकूण पाच अतिरिक्त जिल्हा मंच स्थापन करण्यात आले आहेत. जिल्हयाच्या मुख्यालयामध्ये हे मंच कार्यरत आहेत. सध्या जिल्हा स्तरावर एकूण ४० जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच व तात्पुरत्या स्वरुपात तीन अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन करण्यात आले आहेत. राज्य व जिल्हा मंचाची अधिकारीता
रूपये २० लाख ते रूपये एक कोटी पर्यंतच्या किंमतीचे दावे राज्य आयोगाकडून हाताळण्यात येतात तसेच जिल्हा मंचानी दिलेल्या निर्णयाविरूध्दच्या अपिलांचा निवाडा राज्य आयोगास करावा लागतो.
रूपये २० लाख पर्यंतचे दावे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये हाताळले जातात.
राज्य सरकारच्या जिल्हा मंचामध्ये राज्य सरकार किती सदस्य नियुक्त करतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.