अनेक प्राणी, पक्षी अन्नासाठी वृक्षाच्या फळांचा, पानांचा उपयोग करतात. कवके, लायकेन, शैवाले या वनस्पती वृक्षांवर वाढत असतात. त्यामुळे अनेक अन्नसाखळ्या आणि अन्नजाळ्या वृक्षाच्या आधारे तयार होत असतात. म्हणून वृक्ष हा एक स्वतंत्र परिसंस्था आहे असे म्हटले जाते.