वन शेती ही शेती उत्पादनातील सुधारित पद्धत आहे. महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण विभागातील कमी व अनिश्‍चित पाऊसमानात हलक्‍या, उथळ, क्षारयुक्त व नापिक, पाणथळ जमिनीत नेहमीचे पीक बऱ्याच वेळा फायदेशीर ठरत नाही, तसेच आर्थिकदृष्ट्या परवडतदेखील नाही. अशा जमिनीत परिस्थितीमुळे प्रचलित पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे.