मानवी जीवनाच्या समस्या मानसशास्त्राच्या आधारे सोडवता आल्या पाहिजेत, ही वर्तनवादाची अपेक्षा आहे. मानवी वर्तनाची अचूक भाकिते करता आली, तर मानवी व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल, अशी वर्तनवादाची धारणा आहे.