स्वराज्याच्या रक्षणाचे एक प्रमुख साधन म्हणून किल्ल्याचा उल्लेख प्राचीन काळापासून आढळतो. राज्याच्या सप्त अंगांत दुर्ग हे एक महत्वाचे अंग आहे. वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये किल्ल्याचे वेगवेगळे प्रकार पाडलेले आहेत परंतु त्यांचा अर्थ जवळपास एकच असतो हे लक्षात घेतले पाहिजे.