शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे. शब्दांचे लेखनरूप लिहिले जात असताना साधारणतः होणाऱ्या चुका या ऱ्हस्व, दीर्घ वेलांटी, उकार या लिपिचिन्हांच्या बाबतीत होतात. अशा प्रकारच्या चुका टाळण्यासाठी शुद्धलेखनाचे नियम बनविण्यात आले आहेत.