संभाजी महाराज सिद्दिच्या मोहिमेवर असतांना मुघलांनी स्वराज्यावर चाल केली. त्यामुळे संभाजी महराजांना ती मोहिम अर्धवट सोडुन माघारी यावे लागले. त्याच वेळेस गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांविरुध्द अकबर बादशाहाशी हात मिळवणी केली. त्यामुळे महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवायचे ठरवले.