कोणतेही दोन समतुष्टी वक्र एकमेकांना छेदत नाहीत. प्रत्येक समतुष्टी वक्र'य ' भुजेकडून'क्ष' भुजेकडे उतरत जातो कारण जसजसे एका वस्तूचे परिमाण वाढत जाते, तसतसे दुसऱ्या वस्तूचे परिमाण कमीकमी झाले पाहिजे, तरच समाधानाची पातळी कायम राहील. समतुष्टी वक्राच्या उताराचा कल दोन वस्तूंमधील सीमांत प्रतिस्थापन दराने दर्शविला जातो.