प्रश्नांची यादी

चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का? open

वास्तविक चंद्राला स्वतःचे तेज नसते किंवा स्वत:चा प्रकाश नसतो. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो आणि त्याचे प्रतिबिंबित होऊन पृथ्वीवर पडते. सुर्य प्रकाशाच्या या परावर्तनामुळे चंद्र आपल्याला चमकताना दिसतो. चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 30 दिवस लागतात.

पूर्ण वाचा →

लीप वर्ष मधे किती दिवस सुरू? open

पोप ग्रेगरीने 1582 या वर्षातील ऑक्टोबरमहिन्यातून 12 दिवस वजा केले. ज्या वर्षाला 4 ने भाग जातो त्याला लीप वर्ष मानले जावे. त्यात 366 दिवस असतील

पूर्ण वाचा →

लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात? open

ग्रेगरियन दिनदर्शिकेनुसार ज्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात २८ च्या ऐवजी २९ दिवस असतात अशा वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात. साधारणतः लीप वर्ष दर चार वर्षांनी येते.

पूर्ण वाचा →

स्वतः भोवती फिरण्यास किती दिवस लागतात? open

पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २४ तास लागतात. तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात

पूर्ण वाचा →

सूर्याचा प्रकाश पृथ्वी पर्यंत पोहोचण्यास लागणारा सरासरी कालावधी किती आहे? open

सूर्याच्या पृष्ठभागावरून पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सूर्यप्रकाशास सुमारे 8.3 मिनिटे लागतात.

पूर्ण वाचा →

ऋतू निर्मिती का होते? open

पृथ्वीच्या पृष्ठभागास व वातावरणास सूर्यापासून मिळणार्‍या ऊर्जेत फेरफार होत असल्यामुळे ऋतू निर्माण होतात. जागतिक दृष्ट्या हिवाळा व उन्हाळा हे दोनच ऋतू मानतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवती परिभ्रमण करीत असताना तिचा अक्ष तिच्या कक्षेच्या पातळीशी लंब नसून सु. ६६.५ अंशांचा कोन करतो

पूर्ण वाचा →

सूर्य नमस्काराचे कोणते फायदे आहेत आणि सूर्यनमस्कार आसनाचे नावे काय आहे? open

जर तुम्हाला जाडेपणाची समस्या असेल तर रोज कमीत कमी 10 वेळा सूर्य नमस्कार केल्यास तुमचं वजन कमी होईल. कारण सूर्यनमस्काराचे एक नाही अनेक फायदे आहेत. रोज सूर्य नमस्कार केल्यास मनाची एकाग्रता वाढते. तसंच शरीराची लवचिकता वाढते, त्वचा उजळते, हाडं मजबूत होतात, पचनशक्ती वाढते आणि डोक्यातील तणावही दूर होतो

पूर्ण वाचा →

सूर्य नाहीसा झाला तर काय होईल? open

सूर्य नसेल तर उर्जा नाही, उर्जा नाही तर यंत्रे नाहीत. मग मानव अगदी आदिमानवाच्या काळात जाईल आणि शेवटी ह्या पृथ्वीवरून नाहीसाच होईल, मुख्य म्हणजे सूर्याच्या उन्हामुळे समुद्रातील पाणी गरम होऊन आकाशात जाते. तेच पाणी पुन्हा पावसाच्या रूपाने परत जमिनीवर येते.

पूर्ण वाचा →