संवादा शिवाय नातं फुलतंही नाही आणि बहरतंही नाही. ज्याप्रमाणे डिंक किंवा एखादा चिकट पदार्थ दोन पदार्थांना जवळ ठेवण्याचं काम करतो त्याप्रमाणेच संवाद दोन व्यक्तींना , नात्यांना, व्यवहारांना जोडून ठेवण्याचे काम करतो. म्हणूनच मानवी जीवनामध्ये संवादाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, त्यामुळे आपला संवाद हा नेहमी गोड असायला हवा.