केरळमधील पुरामुळे वेलची, मिरी, तमालपत्र हे मसाल्यात वापरले जाणारे पदार्थ महागले असून, त्यांच्या दरामध्ये वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात गेल्या महिन्याभरात हे दर वाढल्यामुळे किरकोळ बाजारांमध्येही या मसाल्यांच्या पदार्थांचे दर तेजतर्रार झाले आहेत.