ज्या परिसरासभोवती कसदार शेतीला योग्य जमीन आहे तसेच जेथे शेती होते आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध आहे अशा ठिकाणास गाव असे म्हटले आहे. आधुनिक काळात जेथे शेती आणि व्यापार उदीम चालतो त्यास गाव असे म्हणता येईल. गाव हे साधारणपणे नदी काठी अथवा पाण्याचे स्रोत असतील अशा ठिकाणी वसलेले आढळते.