आपण जेव्हा बोलतो, संभाषण करतो. तेव्हा आपल्याला मधूनमधून थांबावे लागते. या थांबण्याला ‘विराम‘ असे म्हणतात. बोलण्यातील निरनिराळ्या चिन्हांनी दाखवले जातात. अशा चिन्हांना ‘विरामचिन्हे‘ असे म्हणतात. विरामचिन्हांमुळे वाक्य कोठे संपले, कोठे सुरू झाले की अपूर्ण आहे? अशा विविध गोष्टी कळतात. म्हणून मराठी व्याकरणात विरामचिन्हांना लेखनात महत्त्व असते. अशा चिन्हांचा वापर केव्हा व कोठे करावा हे समजून घ्यावे लागेल.