प्रश्नांची यादी

सकारात्मक म्हणजे काय? locked

सकारात्मक विचार म्हणजे आशावादी मानसिकता असे म्हटले जाते. कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करण्याची कृती म्हणजेच सकारात्मक विचार

होय. सकारात्मक विचारांमुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम होण्याची क्षमता असते. आशावाद आणि सकारात्मक विचारांचा मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या संदर्भात विस्तृत अभ्यास केला गेला आहे. त्यामुळे आरोग्यदायी जीवनासाठी सकारात्मक दृष्टीकोन

पूर्ण वाचा →

व्यक्तिस्वातंत्र्य विचारसरणीचा मुख्य उद्देश काय? locked

व्यक्तिस्वातंत्र्य : आधुनिक उदारमतवादी आणि लोकशाही राजकीय विचारात व्यक्तिस्वातंत्र्यास महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी त्याच्या व्यक्तिमत्त्वात सुप्त असणाऱ्या गुणांचा आविष्कार करण्यासाठी स्वातंत्र्याची आवश्यकता असते. स्वातंत्र्याच्या मदतीने व्यक्ती आपल्या इच्छेप्रमाणे स्वत:चा विकास घडवून आणू शकते. व्यक्तीला मिळालेले स्वातंत्र्य आणि अधिकार हे तिला निसर्गत:च प्राप्त झालेले आहेत. स्वातंत्र्य नसेल

पूर्ण वाचा →

सकारात्मक अर्थाने स्वतंत्र म्हणजे काय? locked

सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचा व अधिकाराचा वापर करून त्याच्या कक्षा रुंदावणे. नकारात्मक स्वातंत्र्य असल्याशिवाय व्यक्ती सकारात्मक स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकत नाही. नकारात्मक स्वातंत्र्य सर्वच व्यक्तींना उपलब्ध असते.

सकारात्मक स्वातंत्र्यनुसार कायदा व्यक्तीला मार्गदर्शन करतो. कायद्याच्या मदतीनेेे व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते. रूसो यांनी सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे.कारण त्यांच्या मते,नैतिक कायद्याच्या

पूर्ण वाचा →

नकारात्मक स्वातंत्र्याचा समर्थक कोण होते? locked

नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना अभिजात उदारमतवाद आणि नवउदारमतवाद या दोन विचारप्रणालीमधून उदयास आली आहे.जॉन स्टुअर्ट मिल,इसाया बर्लिन, फ्रेडरिक हायेक,रॉबर्ट नोझिक या विचारवंताच्या लेखनामध्ये नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे. स्वातंत्र्य वरील सर्व बंधनांना नकारात्मक स्वातंत्र्य नाकारते. राज्यसंस्थेने व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करण्यास नकारात्मक स्वातंत्र्य विरोध करते. राज्यसंस्था, सामाजिक, आर्थिक व्यवहारात हस्तक्षेप करत

पूर्ण वाचा →

सत्य शोधण्यासाठी स्वातंत्र्याची गरज आहे असे कोण मानते? locked

स्वतंत्र भारतात १९५० साली लागू झालेल्या भारतीय संविधानात समाविष्ट असणारी 'स्वातंत्र्य, समता, आणि सामाजिक न्याय' ही मूलभूत तत्वे अत्यंत महत्वाची आहेत. सुमारे दीडशे वर्षे इंग्रजांच्या अंमलाखाली पारतंत्र्यात असलेल्या, आणि शेकडो वर्षे जातीय व आर्थिक विषमतेच्या दबावाखाली जगणार्‍या भारतीय समाजासाठी संविधानातील ही तत्वे एका नव्या युगाच्या नांदीसारखी होती. स्वातंत्र्य, समता, आणि

पूर्ण वाचा →

स्वातंत्र्याचे प्रकार किती आहेत? locked

‘स्वातंत्र्य’ हा शब्द बहुचर्चित आहे. राज्यशास्त्रात तर त्याचे प्रस्थ आहेच, पण आपल्या रोजच्या व्यवहारात आणि सार्वजनिक चर्चांमध्ये या शब्दाचा वापर सतत होत असतो. मात्र शब्द प्रचलित असला तरी त्यात अंतर्भूत असलेल्या तीन अर्थांची आपल्याला नेहमीच जाणीव असते अशातला भाग नाही.

राष्ट्रीय स्वातंत्र्य

स्वातंत्र्याचा एक अर्थ म्हणजे ‘राष्ट्रीय’ स्वातंत्र्य. भारताला १५ ऑगस्ट १९४७

पूर्ण वाचा →

अमृत महोत्सव वर्ष म्हणजे काय? locked

अमृत महोत्सव (Platinum jubilee - प्लॅटीनम जुबली) म्हणजे ७५ वा वर्धापन दिन होय. याला अमृत जयंती किंवा पंताहत्तरावी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ७५ वर्ष पूर्ण

पूर्ण वाचा →

रौप्य महोत्सवी वर्ष म्हणजे किती? locked

रौप्य महोत्सव हे २५ वर्ष झाले की साजरे करतात...
अजुन काही थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती खाली वाचा...
1. रौप्य महोत्सव (Silver Jubilee) = २५ वर्ष

2. सुवर्ण महोत्सव (Golden Jubilee) = ५० वर्ष

3. हिरक महोत्सव (Diamond Jubilee) = ६० वर्ष

4. अमृत महोत्सव (Platinum jubilee) = ७५ वर्ष

5. शताब्दी महोत्सव

पूर्ण वाचा →