प्रश्नांची यादी

महाराष्ट्रात पंचायतराजची सुरुवात कधी करण्यात आली? open

२ ऑक्टोबर १९५९ रोजी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन केले. आणि देशांत पंचायत राज सुरु झाले अशी घोषणा केली. त्यानंतर ही व्यवस्था पंचायत राज या नावाने लोकप्रिय झाली.

पूर्ण वाचा →

भारतात पंचायती राज संस्थांचे शुभारंभ कधी करण्यात आला? open

२ ऑक्टोबर १९५९ रोजी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन केले. आणि देशांत पंचायत राज सुरु झाले

पूर्ण वाचा →

मध्यवर्ती निवडणूक म्हणजे काय? open

विशिष्ट परिस्थितीत निश्चित कालावधीच्या ( पाच वर्षे ) आधीच लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका घ्याव्या लागतात. अशा निवडणुकांना " मध्यावधी निवडणुका " असे म्हणतात. बहुमताने अधिकारावर आलेले सरकार मुदतीआधीच पक्षफुटीमुळे अल्पमतात येऊ शकते.

पूर्ण वाचा →

राष्ट्रपती किती सदस्यांचे राज्यसभेवर नामनिर्देशन करू शकतात? open

राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात.

पूर्ण वाचा →

जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव कोण असतात? open

जिल्ह्याचे पालकमंत्री या समितीचे अध्यक्ष असतात, तर जिल्हा परिषद अध्यक्ष या समितीचे सदस्य असतात. जिल्हाधिकारी या समितीचे सदस्य सचिव असतात. नामनिर्देशित सदस्य म्हणून जिल्ह्यातील मंत्री हे सहअध्यक्ष असतात.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रातील जिल्हे किती व त्यांची नावे? open

महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत मुंबई मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग ,नाशिक, अहमदनगर ,धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर उस्मानाबाद, बीड ,अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम ,यवतमाळ ,नागपूर ,वर्धा ,भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली.

पूर्ण वाचा →