नवीन प्रश्न

१ इतिहासाची साधने किती प्रकारची आहेत? open

इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असतो या पुराव्यांना इतिहासाची साधने असे म्हणतात. साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करता येते.

पूर्ण वाचा →

वाळवंटी प्रदेश म्हणजे काय? open

वाळवंटी प्रदेश. वाळवंट म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठभागावरील असा अतिकोरडा प्रदेश, की जेथे वनस्पती व प्राणिजीवन अत्यंत विरळ असते. सामान्यपणे शुष्क, ओसाड व वालुकामय भूमीला वाळवंट म्हणून ओळखले जात असले, तरी तांत्रिक दृष्ट्या वसाहतीच्या दृष्टीने अतिथंड प्रदेशांचाही यात समावेश केला जातो.

पूर्ण वाचा →

शीत वाळवंट कुठे आहे? open

शीत वाळवंटात हे अतिथंड हिवाळा असतो. हे वाळवंट सामान्यत: पर्वतीय भागात आढळतात. लडाख हे भारतातील एकमेव शीत वाळवंट आहे, जे हिमालयात वसलेले आहे. हिमालयातील पर्जन्यवृष्टी असलेल्या पावसाळ्यात त्यावर काही परिणाम होत नाही.

पूर्ण वाचा →

साक्षरता दर म्हणजे काय? open

साक्षरता म्हणजे लिहिता वाचता येणे किवा शिक्षण घेणे होय. साक्षरता म्हणजे केवळ लिहिता वाचता येणे इतकाच अर्थ अभिप्रेत नाही तर एखाद्या विशिष्ट उद्दिष्टासाठी वा ज्ञानार्जनासाठी लिपीचा उपयोग करण्याची कार्यक्षमता म्हणजे साक्षरता होय.

पूर्ण वाचा →

५ लोकसंख्या घनता म्हणजे काय? open

एका विशिष्ट क्षेत्रफळात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या म्हणजे लोकसंख्येची घनता होय. सहसा घनता "प्रती वर्ग किमी" मध्ये मोजली जाते. उदा. भारताच्या लोकसंख्येची घनता १२३ प्रती वर्ग किमी आहे, म्हणजेच भारताच्या १ वर्ग किमी भागात सरासरी १२३ व्यक्ती राहतात.

पूर्ण वाचा →

भारतामध्ये किती लोक राहतात? open

UN डेटानुसार भारत 2020 लोकसंख्या अंदाजे 1,380,004,385 लोकसंख्या आहे. भारताची लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 17.7% इतकी आहे. लोकसंख्येनुसार देशांच्या (आणि अवलंबनांच्या) यादीत भारताचा क्रमांक 2 आहे.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात सध्या किती पंथ आहेत? open

महाराष्ट्रामध्ये अनुसरले जाणारे विविध धर्म हे धार्मिक श्रद्धा आणि प्रथांमधून आपली विविधता दर्शवितात. महाराष्ट्रात जगातील किमान आठ धर्मांचे अनुयायी आहेत; ते म्हणजे हिंदू धर्म, इस्लाम, बौद्ध धर्म, जैन धर्म, ख्रिश्चन धर्म, शीख धर्म, पारशी धर्म आणि यहुदी धर्म होय.

पूर्ण वाचा →

२०११ च्या जनगणनेनुसार बौद्ध धर्माची लोकसंख्या किती आहे? open

२०११ च्या भारतीय जनगणनेच्या अहवालानुसार सबंध भारतात सुमारे ८४,४२,९७२ बौद्ध लोक होते, यापैकी ६५,३१,२०० म्हणजेच ७७.३६% बौद्ध हे महाराष्ट्र राज्यातील होते.

पूर्ण वाचा →