प्रश्नांची यादी

आयएएस दर्जाच्या जिल्हाधिकारी ची निवड कोण करते? open

त्याची निवड संघ लोकसेवा आयोग करत असते. जिल्हाधिकाऱ्यांची निवड दोन मार्गाने केले जाते. पहिला मार्ग म्हणजे सरळ सेवा भरती होय. संघ लोकसेवा आयोगाकडून भारतीय प्रशासकीय सेवा पदासाठी निवड केलेल्या उमेदवाराची जिल्हाधिकारी म्हणून राज्यशासन नेमणूक करते.

पूर्ण वाचा →

स्वराज्याचे पहिले किल्लेदार कोण होते? open

माणकोजी दहातोंडे सुर्यवंशीय क्षत्रिय मराठा ह्या कुळातील होते. त्यांचे मुळगाव अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांदा आहे.

पूर्ण वाचा →

मुजुमदार म्हणजे काय? open

पंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र नीलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल, परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या त्या महाल, परगण्यातील अधिकाऱ्याकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम होते. तसेच लिहून तो तपासून महाराजांसमोर सादर करावा लागत असे.

पूर्ण वाचा →

शिवरायांकडे कोण कोणते किल्ले होते? open


महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडू व गोवा या सध्याच्या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे. यापैकी सुमारे 111 किल्ले शिवाजी महाराजांनी बांधल्याची नोंद एका बखरीत आहे. तसेच त्यांनी 49 किल्ले डागडुजी करून त्यात आवश्‍यक ते बदल केले व ते अभेद्य बनविले. असे एकूण १६० किल्ले शिवाजी महाराजांच्या नावावर आहेत.

पूर्ण वाचा →

मुघलांच्या शासनकाळात उलेमा कोण होते? open

इस्लामी धर्म अथवा कायदा अथवा दोन्हीही जाणणारे तज्ज्ञ अथवा व्यावसायिक धर्मशास्त्रवेत्ते तसेच त्यांनुसार न्यायदान करणारे कादी (न्यायाधीश), मुफ्ती (फतवा काढणारा धर्मशास्त्री), इमाम (नमाजाचे संचालन करणारा नेता) ह्या सर्वांना 'उलेमा' (उलमा) ही संज्ञा लावली जाते.

पूर्ण वाचा →

पेशवे काळातील प्रसिद्ध चित्रकार कोण होता? open

गंगाराम तांबट हे पेशव्यांच्या काळातील चित्र कलेच्या क्षेत्रातील अतिशय मोठे नाव होते. जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा आणि वेरुळ येथील लेण्यांमध्ये गंगाराम तांबट यांनी चित्रे रेखाटली आहेत.

पूर्ण वाचा →