प्रश्नांची यादी

मिठाचा कायदा मोडला म्हणून पहिली महिला कैदी कोण होत्या? open

अवंतीबाई गोखले आणि कमलादेवी चट्टोपाध्याय या मिठाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आणि ब्रिटिशांचे कायदे मोडणाऱ्या पहिल्या महिला होत्या.

पूर्ण वाचा →

म गांधींनी प्रथम वकिली कुठे सुरु केली? open

भारतात आल्यावर त्यांनी मुंबई येथे वकिली सुरू केली; पण जम बसेना. या वेळी इंग्रजी पद्धतीचा पोषाख ते करीत होते. पोरबंदराच्या एका मुसलमान व्यापाऱ्याने दक्षिण आफ्रिकेतील कज्‍जासाठी गांधींची गाठ घेतली व एका वर्षाच्या कराराने, १८९३ च्या एप्रिलमध्ये दक्षिण आफ्रिकेत नेले.

पूर्ण वाचा →

हरिजन शब्दाचा अर्थ काय? open

'अस्पृश्य' किंवा 'अछूत'सारखे शब्द वापरून माणसांच्या जित्याजागत्या समूहाला वेशीवर उभे करण्याची परंपरा या देशाने अवघ्या काही दशकांपूर्वी अनुभवली. गावकुसाबाहेर टाकल्या गेलेल्या समाजाला सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून मग महात्मा गांधीनी एका शब्दाची निर्मिती केली. गांधीजींनी शब्द दिला, 'हरिजन'

पूर्ण वाचा →

महात्मा गांधी व आयर्विन यांच्यात करार कधी झाला? open

गांधी-इरविन करार' हा महात्मा गांधी आणि लंडनमधील दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या आधी ५ मार्च १९३१ रोजी भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड इर्विन यांनी केलेला राजकीय करार होता.

पूर्ण वाचा →

सर्वोदय विचार या ग्रंथाचे लेखक कोण आहे? open

सर्वोदय हा महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानातून निर्माण झालेला विचार आहे. रस्किनच्या अन टू धिस लास्ट या पुस्तकाचा गांधीजींनी गुजराती भाषेत अनुवाद करुन त्याला सर्वोदय नाव दिले होते.

पूर्ण वाचा →

सरहद्द गांधी म्हणजे कोण *? open

खान अब्दुल गफारखान (१८९० - १९८८), सरहद्द गांधी व बादशाह खान या नावाने प्रसिद्ध, हे वायव्य सरहद्द प्रांतातील स्वातंत्र्यसेनानी होते. ज्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतला होता. भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते.

पूर्ण वाचा →

साबरमती आश्रमाची स्थापना गांधीजींनी कुठे केली? open

साबरमती आश्रम हा भारतातील गुजरात राज्यातील अमदावाद शहराजवळ साबरमती नदीच्या किनाऱ्यावर आहे. याची स्थापना महात्मा गांधींनी १७ जून इ. स. १९१७ साली केली होती.

पूर्ण वाचा →

गांधीजींनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय? open

गांधींनी अगदी ऐनवेळी चळवळ तहकूब केली. गांधीजींना हिंसाचार मान्य नव्हता हे खरे आहे. पण इतक्या मोठ्या देशव्यापी आंदोलनामध्ये स्थानिक जनतेध्ये शिस्त राहणे अवघड होते आणि तशा स्वरूपाचे प्रशिक्षण जनतेला नव्हते आणि सरकारच्या दडपशाही विरुद्ध जनता प्रतिक्रिया देत होती. या सर्व गोष्टींचा तार्कीक विचार न करता चळवळ तहकूब केली.

पूर्ण वाचा →